14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस संपुर्ण देशात साजरा केला जातो.या दिवसाचे एवढेच महत्व नसून 14 एप्रिल 1889 रोजी महात्मा फुले यांनी खुप मोठी क्रांती केली होती.याच दिवस ब्राह्मण महिलांना केशवपन प्रथेतून मुक्त केले होते.त्यामुळे संपूर्ण ब्राह्मण स्त्रियांनी 14 एप्रिल रोजी नाभिक (न्हावी) बांधवांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करावी असं डॉ लता प्रतिभा मधुकर यांनी व्यक्त केले आहे. Brahmin women should express their gratitude by tying rakhi to barber brothers
Brahmin women should express their gratitude by tying rakhi to barber brothers
ब्राह्मण स्त्रियांनी न्हावी बंधूंनी “केशवपन” थांबवले म्हणून त्यांना राखी बांधून कृतज्ञता दिवस पाळावा. डॉ लता प्रतिभा मधुकर .Brahmin women should express their gratitude by tying rakhi to barber brothers
केशवपन म्हणजे काय
स्वातंत्र्य पुर्व काळात ब्राह्मण समाजात एखादा ब्राह्मण मेला असता त्यांच्या पत्नीच्या डोक्यावरील केस कापून टाकले जात असत.या प्रथेला केशवपन असे म्हटले जाते.हि प्रथा महात्मा ज्योतिबा फुले यांनी नाभिक (न्हावी) बांधवांना सोबत घेऊन 14 एप्रिल 1889 रोजी संपुष्टात आनलीBrahmin women should express their gratitude by tying rakhi to barber brothers
सत्यशोधक चित्रपटा केशवपन प्रथा बंद केलेला प्रसंग पहाण्यासाठी खाली क्लिक करा
जगातील पहिला संप
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समाजा बद्दल आणि न्हावी समाजा बद्दल ब्राह्मण स्त्रियांनी कायम कृतज्ञता बाळगायला हवी. 14 एप्रिल 1889 रोजी मुंबई येथे 1000 न्हावी बांधवांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या नेतृत्वाखाली “आम्ही विधवा स्त्रियांचे केशवपन करणार नाही,” असे सांगत येथील ब्राह्मणवादी कर्मठ आणि क्रूर रूढी ला विरोध करत मोठा संप केला.
आज पर्यंत आपण ऐकतो की संप रोजी रोटी टिकावी म्हणून केला जातो.परंतु आपल्या रोजी रोटी ला तिलांजली देऊन रूढी परंपरा नाकारत ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन थांबावे म्हणून केलेला हा जगातील पहिला असा संप आहे. म्हणून ब्राह्मण समाजातील महिलांनी कृतज्ञता म्हणून नाभिक समाज जो आज ओबीसी म्हणून मागे पडला आहे, त्यांच्या आरक्षण, शिक्षण , रोजगाराच्या संधी साठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे.Brahmin women should express their gratitude by tying rakhi to barber brothers
नाभिक (न्हावी) समाजाचा ऐतिहासिक संप पहाण्यासाठी खाली क्लिक करा
लक्षात घ्या, अंधश्रद्ध ब्राह्मण होते. आणि आज ते जो समाज सत्यशोधक होत होता, त्या समाजातील लोकांना मंदिर आणि कर्मकांडाला बळी पाडत आहेत. आज सर्व ओबीसी नी सत्यशोधक होऊन त्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. न्हावी समाजासाठी ब्राह्मण स्त्रिया ज्या दिवशी कृतज्ञता दिवस पाळतील, तो दिवस महत्वाचा.
स्त्रियांनी कृतज्ञता व्यक्त करावी
नाभिक समाजासाठी काम करणाऱ्या स्त्री चा सत्कार करून पुन्हा आम्ही तुमचा सत्कार करतो असे दाखवण्यापेक्षा तुमच्या मुळे आज आमचे “केशवपन” थांबले, म्हणून तुमचा सत्कार , अशी. भूमिका घ्यावी लागेल. त्याशिवाय “समता” येणार नाही. अगदी प्रतीकात्मक नाभिक (न्हावी) बंधूंना ब्राह्मण स्त्रियांनी राखी बांधून त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवण्याचा प्रतीकात्मक कार्यक्रम करायला हरकत नाही.Brahmin women should express their gratitude by tying rakhi to barber brothers
त्या वेळेच्या सत्यशोधक न्हावी समाजा प्रमाणे पुन्हा एकदा या धर्मांध रूढी वादी शक्तींच्या विरोधात सत्यशोधक होऊन ओबीसी नी एकजूट केली पाहिजे.
न्हावी समाजातील सर्व सत्यशोधक बांधवांना क्रांतिकारी अभिवादन.
जय सत्यशोधक
डॉ लता प्रतिभा मधुकर
अध्यक्ष
ओबीसी महिला राजकीय आघाडी
न्हावी आणि ब्राह्मण कायम सोबत
तसे पाहिले तर हिंदू धर्मात प्रत्येक विधीला न्हावी आणि ब्राह्मण हे सोबतच आसतात.जसे “जावळ काढणं” ,मुंज करणं, लग्नामध्ये टिळा लावन न्हावी बांधव तर लग्न लावून ब्राह्मण करत आसतो.तसेच मृत्यू झाल्यावर दहावा, तेराव्याचा विधी या दोघांशिवाय पुर्ण होत नाही.हेही तितककेच खरं आहे.Brahmin women should express their gratitude by tying rakhi to barber brothers
माझे जेव्हा जात विषयावर पूर्ण दिवसाचे सत्र या विद्या बाळ प्रकल्प अंतर्गत त्यांनी आयोजित केले होते, तेव्हा मी ब्राह्मण स्त्रियांनी न्हावी समाजाबद्दल कृतज्ञता दिवस पाळण्याची सुरुवात करावी , असा कृती कार्यक्रम सुचवला होता.
डॉ लता प्रतिभा मधुकर