नाभिक समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा महात्मा जोतिबा फुले हे नाभिक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.याचे पुरावे आजही इतिहासात पहावयास मिळतात.
स्वातंत्र्य पुर्व काळात नाभिक समाजाला सर्वप्रथम संघटीत करून एक हजार नाभिकाची मुंबईत विशाल सभा घेनारे म्हणून महात्मा जोतिबा फुले यांचे नाव समोर येते.
मित्रांनो स्वातंत्र्य पुर्व काळात नाभिक समाजावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा नाभिक समाजाच्या पाठीशी महात्मा जोतिबा फुले कसे खंबीरपणे उभे राहिले. या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
11 एप्रिल रोजी महात्मा जोतिबा यांची जयंती आहे.त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याला उजाळा देऊ. Mahatma Jotiba Phule and Nabhib Samaj
सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले
महात्मा जोतिबा फुले हे सत्यशोधक विचारसरणीचेप्रवर्तक होते.त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.सत्यशोधक समाजात अनिष्ट रूढी,प्रथा आणि परंपरांना थारा नव्हता.शिक्षणावर जास्त कल होता.
शिक्षणामुळे माणूस “माणूस” बनतो हे विचार फुले दांपत्यांनी समाजात रुजवले होते.त्यामुळे अनेकांनी शिक्षणाचा मार्ग निवडला होता.योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव प्रतेकाला होत होती.
आपल जीवन कशा पद्धतीने जगले पाहिजे याची जाणीव जनतेला होत होती.पण काही वर्गाची पोटदुखी वाढली होती.त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.म्हणून तो वर्ग विरोध करत होता.Mahatma Jotiba Phule and Nabhib Samaj
अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
काही येत नाही तर हजामती करा
पुण्यातील नाभिक समाज बांधवांनी जून 1875 मध्ये दाढी कटिंग करण्याचे दर वाढवले होते.तेव्हा या दरवाढीला पुण्यातील ब्राम्हण वर्गाने विरोध केला.परंतू नाभिकांनी दरवाढ मागे घेतली नाही.
यावर उपाय म्हणून पुण्यातील ब्राम्हण वर्गाने काही दिवस एकमेकांच्या हजामती केल्या.कारण नाभिक समाजाला दाढी कटिंग करण्याचे जास्तीचे पैसा द्यावा लागत होते. याचा उल्लेख “नेटीव ओपिनियन” या पत्रामध्ये आढळतो.
काळानूसार हा व्यवसाय चांगला आहे.असे आनेकांचेमत होते.Mahatma Jotiba Phule and Nabhib Samaj
ब्राह्मणांच्या हजामती करण्याचे नाकारले
सन 1887 मध्ये पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे एका नाभिक समाज बांधवांने महात्मा जोतिबा फुले यांनी सांगितलेल्या “सत्यशोधक” पद्धतीने आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला.त्या विवाह सोहळ्यास “ब्राह्मणास” बोलावले नाही.
यामुळे पुण्यातील ब्राम्हण आणि नाभिक समाजात तेढ निर्माण झाले. ब्राह्मणांच्या हजामती न करण्याचे नाकांनीभि ठरवले. “मोठा पेच प्रसंग निर्माण झाला” ब्राह्मणांनी आम्हीच नाभिकावर बहिष्कार टाकला आशा प्रकारची आफवा पुण्यात पसरवली.
आणि “ब्राम्हण काखेत धोपटी घेऊन न्हाव्याप्रमाणे फिरु लागले” यावेळी इतर समाजाने नाभिकांची बाजु घेऊन हा लढा तीव्र केला.अखेरीश पुण्यातील ब्राम्हणांना माघार घ्यावी लागली.Mahatma Jotiba Phule and Nabhib Samaj
अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
नाभिकांनी आपले शस्त्र वापरावे “न्हावण्यास्त्र”
हि घटना 1860 साली पुणे जिल्ह्यातील आहे. एका नाभिकांने पुण्यात घर बांधले.घराच्या वास्तुशांतीसाठी ब्राह्मणाला बोलावले पण त्या ब्राह्मणाने वास्तुशांती च्या पुजेसाठी चक्क नकार दिला. एवढेंच नव्हे तर इतर ब्राह्मणांना वास्तुशांती पुजेसाठी न जाण्याचे सांगितले.
तेव्हा त्या नाभिकाने एका भटजीला जास्तीचे पैसे देऊन आपली वास्तुशांती ची पुजा करुन घेतली. हि गोष्ट पुण्यातील ब्राम्हणांना समजली तेव्हा त्या भटजीवर पुण्यातील ब्राम्हणांनी बहिष्कार टाकला.
हि बातमी जशी नाभिक बांधवांना समजली तेव्हा ते “महात्मा जोतिबा फुले” यांच्या कडे गेले.व सर्व हकिकत सांगितली तेव्हा महात्मा जोतिबा फुले यांनी नाभिकांना सल्ला दिला की “नाभिकांनी आपले शस्त्र वापरावे, न्हावण्यास्त्र” जे ब्राह्मण त्या गरीब भटजीला छळीत होते.
त्यांच्यावर हजामतीचा बहिष्कार टाकला. तेव्हा पुण्यातील ब्राम्हणात मोठी खळबळ निर्माण झाली.कारण महात्मा जोतिबा फुले यांच्या सल्ल्याने नाभिकांनी त्या ब्राह्मणाच्या “हजामती” करण्याचे नाकारले होते.Mahatma Jotiba Phule and Nabhib Samaj
केशवपनाची प्रथा नाभिकांनी बंद करावी
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या डोक्यावरील केस कापण्याच्या प्रथेला “केशवपन” म्हटले जाते.स्वातंत्र्यपुर्व काळात ही प्रथा प्रचलित होती.हि प्रथा बंद करण्यासाठी फुले दांपत्यांनी नाभिक समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणली.
आणि सांगितले की “स्त्रिचा मौल्यवान दागिना म्हणजे तीचे केस” त्यांच्या पतीच्या निधनानंतर ते काढून आपन त्यांना विद्रुप करत असतो.हि प्रथाबंद झाली पाहिजे.यासाठी फुले दांपत्यांनी 14 एप्रिल 1890 रोजी नाभिक समाजाची एक विशाल सभा मुंबईत घेतली.
या सभेला एक हजार पेक्षा जास्त नाभिक बांधव उपस्थित होते.हि सभा इतिहासात ऐतिहासिक सभा म्हणून नोंद आहे.या विशाल सभेचे अध्यक्ष श्री सदोबा कृष्णाजी हे होते.या विशाल सभेत एक ठराव संमत करण्यात आला.Mahatma Jotiba Phule and Nabhib Samaj
तो म्हणजे “यापुढे कोणत्याही नाभिकांनी विधवा महिलांचे केस कापायचे नाही” हा ऐतिहासिक ठराव संपूर्ण नाभिक समाज बांधवांनी एकमताने मंजूर केला.तसेच “दिनबंधू” या पत्रामधून नाभिकांनी हि प्रथा बंद करण्याचे कळकळीचे आव्हान करण्यात आले होते.
मुंबईच्या मामा पद्मानंदानी “बॉम्बे गॅझेट” मध्ये प्रसिद्ध केले की ज्या नाभिकांने नवीन “विधवेचे केशवपन” केले असेल त्याला नाभिकांनी आपल्या घरी येण्यास बंदी घालावी.
आशा पद्धतीने “केशवपन” प्रथा नाभिकांचा मदतीने “महात्मा जोतिबा फुले” यांनी बंद केली.महात्मा जोतिबा फुले स्वातंत्र्य पुर्व काळात नाभिक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते हे वरील लेखातून सिद्ध होते.Mahatma Jotiba Phule and Nabhib Samaj
संदर्भ – “नाभिक समाजाचा इतिहास” या पुस्तकातून घेण्यात आली आहे.
टिप- वरील पोस्ट इतिहासात काय घडलं या संदर्भात आहे.कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.तसे कोणाला वाटत असल्यास आगोदर माफी मागतो. 🙏🙏