छगन भुजबळ राजकीय कटकारस्थानांचा बळी कसे बनवले.ते या पोस्ट मध्ये सांगितले आहे. Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ साहेब हे केवळ एक नाव नाही, तर ओबीसींच्या अस्मितेचे प्रतीक आणि लढवय्या नेतृत्वाचे प्रतिकात्मक उदाहरण आहेत. भ्रष्टाचाराचे खोटे आरोप आणि राजकीय कटकारस्थानांनी त्यांना अडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही त्यांचा प्रभाव ओबीसी समाजाच्या मनात कायम राहिला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले, मात्र ते “पाच फूटाच्या म्हशीला पंधरा फूटाचं रेडकू होईल का?” असे स्पष्ट शब्दांत प्रश्न विचारत न्यायालयावर संपूर्ण विश्वास दाखवला आणि विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर दिले.Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
भुजबळ साहेबांवरील आरोप आणि राजकीय कटकारस्थान
छगन भुजबळ साहेब यांच्यावर महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. विरोधकांनी त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी जोरदार मोहीम राबवली. माध्यमांमध्ये खोट्या अफवा पसरवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यामागे फक्त आणि फक्त त्यांना संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न होता, हे ओबीसी समाजाने अचूक हेरले.Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी भुजबळ साहेबांनी केलेले प्रयत्न राजकीय शक्तींना पचले नाहीत. त्यांचे वाढते जनाधार, त्यांची ठाम भूमिका आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे अनेक राजकीय गोटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. परिणामी, त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांचे नेतृत्व संपवण्याचा कट रचला गेला.
ओबीसींचे नेतृत्व आणि भुजबळ ब्रँड
छगन भुजबळ साहेब हे ओबीसी समाजाचे नायक आहेत. त्यांनी मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी अनेक संघर्ष उभे केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांसाठी संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांचे नेतृत्व हे महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशात ओबीसी समाजाच्या प्रेरणादायी संघर्षाचे प्रतीक बनले आहे.Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
“भुजबळ” हे केवळ एक व्यक्ती नाही, तर एक ब्रँड आहे, एक विचार आहे. त्यांनी ओबीसी समाजाला अभिमानाने उभे राहायला शिकवले. त्यामुळेच विरोधकांना त्यांची भीती वाटते. त्यांच्या नेतृत्वाने ओबीसी समाजाला नवा आत्मविश्वास दिला आहे, आणि त्यामुळेच त्यांना संपवण्याचे कटकारस्थान आखले गेले.
न्यायपालिकेवर भुजबळ साहेबांचा विश्वास
छगन भुजबळ साहेब यांनी कधीही न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवला नाही. त्यांनी मोठ्या मनाने आणि संयमाने न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात समाजासमोर आदर्श ठेवला.Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
त्यांचे स्पष्ट मत होते की, “सत्य कधीही लपून राहत नाही आणि शेवटी विजय सत्याचाच होतो.” म्हणूनच त्यांनी आपले स्वागत खुल्या मनाने करण्याचा निर्णय घेतला.
ओबीसी समाजाचा पाठिंबा आणि प्रेरणा
महाराष्ट्रातील सकल ओबीसी समाज छगन भुजबळ साहेब यांच्यामागे ठामपणे उभा आहे. त्यांच्यावर झालेले अन्यायपूर्ण आरोप आणि त्रास ओबीसी समाजाने स्वतःवर झालेल्या अन्यायासारखा अनुभवला आहे.
भुजबळ साहेब हे ओबीसी समाजाचे खरे “मसिहा” आहेत, त्यांनी महाराष्ट्रातील मागासवर्गीयांना नवा आत्मसन्मान आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे ओबीसी समाज संघटित झाला आहे आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
छगन भुजबळ साहेब यांच्यावर झालेले आरोप, राजकीय द्वेषातून प्रेरित होते, हे आता उघड झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाला गाडण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरीही ओबीसी समाजाने त्यांना पुन्हा उभारण्याचे काम केले आहे.Chhagan Bhujbal is a victim of political conspiracy
आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत भुजबळ साहेबांचे योगदान आणि त्यांची ठाम भूमिका ही ओबीसी समाजाच्या संघर्षाची आणि अस्मितेची शान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ओबीसी समाज भविष्यात अधिक मजबूत आणि सशक्त होत राहील, यात शंका नाही.
शब्दांकन:
आपलीच
रोखठोक
सपनाताई माळी शिवणकर